शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

विकास आघाडीतून ‘स्वाभिमानी’ हद्दपार : इस्लामपूर नगरपालिका राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:41 IST

इस्लामपूर : वर्षभरापूर्वी इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत निर्माण झालेल्या विकास आघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देभाजपच्या झेंड्याखाली सरसावणार विविध संघटनापालिकेत विकास आघाडीला खोत यांच्यारूपाने ताकद

अशोक पाटील ।इस्लामपूर : वर्षभरापूर्वी इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत निर्माण झालेल्या विकास आघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून खासदार राजू शेट्टी यांना शह देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.खासदार शेट्टी, खोत, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक गट आणि हुतात्मा गट यांनी विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येऊन राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या पालिकेतील एकतीस वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. शेट्टी-खोत यांच्यात वितुष्ट आल्याने खोत यांनी विकास आघाडीतून खा. शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बाजूला केले आहे. याचा प्रत्यय २९ रोजी होणाºया विकास आघाडीच्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून आला आहे. या पत्रिकेत खासदार शेट्टी यांचे नाव घालण्यात आलेले नाही.

इस्लामपूर पालिकेत विकास आघाडीला सत्तेवर येऊन एक वर्ष झाले. मात्र पालिका सभागृहात राष्ट्रवादीचे संख्याबळ जादा आहे. त्यामुळे विकास कामांना आणि ठराव करताना अडचणी येत आहेत. तरीही आगामी काळात होणाºया विकासाचा पाढा सत्ताधारी वाचत आहेत. अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे नियोजन सत्ताधाºयांना जमलेले नाही. असे असतानाही आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीविरोधात पुन्हा एकदा सर्व विरोधकांना एकत्र करण्याचे नियोजन कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने केले आहे.खोत यांनी स्वत:ची रयत क्रांती संघटनेची स्थापना केल्यापासून त्यांनी शेट्टी यांच्यावर कुरघोड्या करण्यास सुरुवात केली आहे. येथे होणाºया विकास आघाडीच्या कृतज्ञता सोहळ्यातील निमंत्रण पत्रिकेतून शेट्टी यांना वगळण्यात आले आहे. यावरूनच विकास आघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हद्दपार केल्याचे बोलले जात आहे.

पालिकेत विकास आघाडीला खोत यांच्यारूपाने ताकद मिळाली आहे. त्यांच्या माध्यमातून शहराला मोठ्या प्रमाणात निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु अद्यापही भरीव निधी मिळालेला नाही. २९ रोजी होणाºया कृतज्ञता सोहळ्यात तरी शहराच्या विकासासाठी काही ठोस उपाययोजना होणार का, याकडेही सर्व शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Politicsराजकारण